Tuesday, July 19, 2011

परवाच एका स्फोटात मेलो

from a 'Mumbai Bomb Blast Victim'

परवाच एका स्फोटात मेलो,
पहिल्याच झटक्यात स्वर्गात गेलो,
स्वर्गात जाण्याचा एकच कायदा होता,
सरळ जगण्याचा हाच एक फायदा होता. -
स्वर्गात जाताच "टिळक" भेटले,
"नमस्कार" म्हणताच प्रसन्न हसले,
..... टिळकांनी विचारले.......
काय रे, स्वातंत्र्या नंतर बदलयं का काही?
म्हटलं , छे हो, सरकारच डोकं ठिकाणावर नाही,
तिथुन लगबगीने "सुभाषबाबु" आले,
विचारु लागले खाली नेमके काय झाले? -
मी म्हणालो, नेताजी काय काय म्हणुन घड्तय हल्ली
फक्त आमदारच म्हणतात चलो दिल्ली !!!
नेताजी ! आजही स्वातंत्र्यासाठी आम्ही रक्तच देतो
फक्त 'खुन' आमच असत आझाद कश्मीर होतो! -
तितक्यात....
दुरवर "सावरकर" दिसले म्हणुन धावलो,
म्हटलं 'तात्या', आज जन्मचा पुण्य पावलो ,
म्हणाले, सध्या तरी सगळ कसं निवांत आहे,
स्वर्र्गात "कांग्रेस" वाला नाही तर सगळं कसं शांत आहे -
त्यांनाच विचारल....
तात्या, इथे सध्या शिवराय कुठे हो राहतात?
म्हणाले, ते पहा सौधतुन आपल्याकडेच पाहतात!
छत्रपतिन्चा विजय असो, म्हणुन चटकन हात जोडले
पण घडलं भलतचं , ते माझ्यावरच ओरडले -
काय रे? कोण्या "जेम्स लेनने" म्हणे बत्तमिजी केल्ली
तुमची अक्कल, तेव्हा सांगा कोठे चरायला गेली? -
मान वर करायची हिम्मत नव्हती,
आणि महाराजांची नजर माझ्या वरुन ढळत नव्हती!
कबुल आहे महाराज, तुमची स्वप्न आम्हाला कळलीच नाही,
पैसा सोडुन आमची नजर, दुसरीकडे वळलीच नाही।
पण रक्षणकर्तेच लांडग्यांसारखे नेमके सावज हेरतात
ब्र म्हणयचा अवकाश, लगेच गाढवाचे नांगर फिरतात .
सगळे ऐकुन महाराजांच्या गालाचे कल्ले थरारले
आमच केविलवाण जगणं बघुन डोळ्यात पाणी तराराले
क्षणभर राजेपण विसरुन ते दु:खाने थाराथाराले
आणि मग आमचं असं वागणं बघुन रागाने बिथरले -
य लटपटले....
वाटलं आता, कम्बख्ति भरलिच म्हणुन समज,
चुकिची शिक्षा, गर्दन मारलीच म्हणुन समजपण,
मेलेल्याला मारायला ते 'खुर्चीतले' नेते नव्हते
न्याय-कठोर असले तरि ह्रुदय त्यांचे 'रीते' नव्हते .
म्हणले, नाव सांग फक्त, खाली जाउन समाचार घेतो,
सांगितलं खाली 'लोकशाहीत' प्रत्येकाचा विचार होतो
खाली आता न्याय बरेचदा विकत मिळतो,
आणि पैसेवाला दुसर्यांच्या जिवाशी खेळतो. -
फक्त एकच काळवीट मारले, म्हणत आपले माजोरडे नाक उडवतो,
कोणीही आपल्या गाडीखली गरिबानां चिरडतो
महाराजांनी मोठ्या मुश्किलीने, डोळ्यातल पाणी आडवलं
कळालं , हेच पातक आम्ही आयुष्यभर घडवल -
मान खाली घालुन तसाच पुढे गेलो............
अहो आश्चर्यम,स्वर्गात मला "औरंग्या" भेटला
म्हणे काफरांना मारुन तर स्वर्ग गाठला
"जिन्हा" सुध्हा होता तिथेच,
म्हणाला, लवकरच आमची संख्या इथे लाखावर जाईल
आणि मग स्वर्गाची सुद्धा फाळणी होईल -

Courtesy: Rajendra Oke

2 comments:

NITIN DIVEKAR said...

Why Dr.Ambedkar and Mahatma Jyotiba Phule did not meet in paradise, may be did not wish meet them>

saurabh V said...

नमस्कार मी सौरभ वैशंपायन.

ही कविता आपल्याला कुठुन उपलब्ध झाली हे समजू शकेल का?

ह्यातली मुळ कविता माझी असून मी ती माझ्या ब्लॉग वरती १० एप्रिल २००७ रोजीच प्रकाशित केली होती.
http://sahajsuchalamhanun.blogspot.in/2007/04/blog-post_10.html

ही कविता निनावी अथवा तोडून मोडून, अथवा वरील प्रमाणे विनाकारणच भर घालून सगळीकडे पसरवली जाते आहे.

आपल्याला ही कविता वापरायचीच असल्यास मुळ कविता वापरावी व ह्या कवितेखाली ती मूळ जशी आहे तशी करुन कृपया माझे नाव द्यावे अथवा ही कविता इथून काढून टाकावी अशी विनंती मी करतो आहे.

हा प्रकार infringement of copyright of intellectual property ह्या सदरात येतो व कॉपीराइट कायद्या अंतर्गत हा अत्यंत गंभीर गुन्हा ठरतो ह्याची जाणीव आपल्यास असेल.

Nothing personal! but every word i wrote, i believe those are my children. If anyone using them withount my permission or without my name ... it makes me furious & it is irritating as well. As a blogger please try to understand my point of view.

LinkWithin

Blog Widget by LinkWithin